लोणी काळभोर प्रतिनिधी
प्रसिद्ध राजकीय पक्षाकडून अपेक्षित न्याय न मिळाल्याने नाराज न होता, प्रकाश सावंत यांनी धैर्याने निवडणूक लढवावी, अशी ठाम व आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी जाहीर केली आहे. “तुम्ही फक्त मैदानात उतरा, उर्वरित सर्व जबाबदारी आम्ही घेतो” असा निर्धार व्यक्त करत कार्यकर्त्यांनी प्रकाश सावंत यांच्या पाठीशी अभेद्य भिंत उभी केली आहे.
कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आमची निष्ठा कोणत्याही पक्षापेक्षा व्यक्तीशी आहे, आणि ती व्यक्ती म्हणजे प्रामाणिक, लढवय्या नेतृत्व असलेले प्रकाश सावंत”. न्याय न मिळाल्याने खचून न जाता, अन्यायाविरुद्ध उभे राहून जनतेच्या न्यायासाठी मैदानात उतरावे, हीच जनभावना सध्या दिसून येत आहे.
“रात्र असो वा दिवस, आम्ही तुमच्यासाठी काम करू, घराघरांत प्रचार करू आणि विजय खेचून आणू” असा शब्द कार्यकर्त्यांनी दिला आहे. प्रकाश सावंत यांची स्वच्छ प्रतिमा, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.
राजकीय समीकरणे बदलत असताना, प्रकाश सावंत यांनी निवडणूक लढवावी, ही केवळ मागणी नसून आता चळवळ बनत चालली आहे. येत्या काळात त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, “नेतृत्व उभे राहिले तर जनता मागे उभी आहे” हे या सादेतून स्पष्ट होत आहे.
मुख्य संपादक.चंद्रकांत दुंडे
8806043369


















