लोणी काळभोर प्रतिनिधी
मल्हारगडाकडे जाणाऱ्या तसेच आळंदी म्हातोबा परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या रस्त्याचे २ किमी मुरुमीकरण करून देण्यात आले असून, त्यामुळे ग्रामस्थ व शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. “कामाचा माणूस, हक्काचा माणूस!” ही ओळ या कामातून प्रत्यक्षात उतरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या रस्त्याबाबतची ठोस मागणी कोपरा सभेत प्रकाश सावंत यांच्याकडे आळंदी म्हातोबा येथील ग्रामस्थांनी मांडली होती. शेतमाल वाहतूक, दूध संकलन, दैनंदिन ये-जा आणि पावसाळ्यातील अडचणी लक्षात घेऊन तातडीने दखल घेत काम सुचवून २ किमी मुरुमीकरण पूर्ण करण्यात आले.
“वर्षानुवर्षांची समस्या सुटली. शब्दांपेक्षा काम महत्त्वाचे असते,” अशा शब्दांत शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या रस्त्यामुळे शेतीकामांना गती मिळणार असून मल्हारगड परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे.
दरम्यान, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पुष्पलता सावंत उभ्या राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक विकासकामांना प्राधान्य देणारी भूमिका मांडत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
कामातून विश्वास निर्माण होतो—आणि तोच खरा हक्काचा माणूस ओळखून देतो, अशी प्रतिक्रिया यावेळी ग्रामस्थांकडून उमटली.
मुख्य संपादक
चंद्रकांत दुंडे
8806043369


















