लोणी काळभोर प्रतिनिधी – गौरव कवडे.
उरूळी कांचन येथील कस्तुरी प्रतिष्ठाने भव्य मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी सोहळ्यात पाच विवाह संपन्न झाले .हा विवाह सोहळा अतिशय नियोजनबध्द पध्दतीने पार पाडून प्रार्थना करणाऱ्या ओढां पेक्षा मदत करणारे हात पवित्र असतात हे समाजापुढे चांगले उदाहरण ठेवले आहे .या विवाह सोहळ्याची माहिती देताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष
मिलिंद मेमाणे यांनी सांगितले की आपण सर्व समाजा.चे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आम्ही कस्तुरी प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहे . दरवर्षी दत्त जयंतीच्या मुहूर्तावर सर्व समाजाचा मोफत विवाह सोहळा घेतला जातो .सर्व कार्यकर्ते दिवस रात्र मेहनत घेत असतात .साखरपुडयाची सुपारी फोडण्यापासुन हळदीचा कार्यक्रम ,नवरदेवाचा परण्याचा कार्यक्रम करून विवाह सोहळयात पार पाडला जातो .सर्व वऱ्हाडी मंडळींना भोजन दिले जाते .यावेळी आलेल्या वधूंनी सांगितले की या सोहळ्यात लग्न करून माझ्या लग्नाचा खर्च माझ्या शिक्षणासाठी करणार आहे .यावेळी कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे , उपाध्यक्ष संतोष भन्साळी ,सचिव शंकर पाटील , खजिनदार महादेव रेवडकर , सदस्य घनश्याम मेमाने ,ऋषिकेश जगताप ,महेश कुंकूलोळ , कौस्तुभ मेमाणे ,गणेश उंबरकर, दत्तात्रय मदने , रुतीका मेमाणे ,प्रियंका रेवडकर व कस्तुरी प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते .
संपादक.चंद्रकांत दुंडे.
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8806043369









