मुंबई | प्रतिनिधी
साधू-संतांच्या आशीर्वादाने आणि थोरा-मोठ्यांच्या मार्गदर्शनातून घडलेली समाजसेवेची वाट, छोट्याशा खेड्यातून मुंबई महानगरीपर्यंत पोहोचली. पोटाची खळगी भरण्यापुरते जग न मांडता समाजासाठी झगडणारे नेतृत्व म्हणून सदाशिव ऊर्फ दाजी बालगुडे ऊर्फ नळवाले दाजी महाराष्ट्रनगर-चिताकॅम्प परिसरात जनतेचा विश्वास बनले आहेत.
मागील ३०–३५ वर्षांपासून मानखुर्द-महाराष्ट्रनगर परिसरात वास्तव्यास असलेले सदाशिव ऊर्फ दाजी बालगुडे यांनी समाजसेवेला केवळ काम न ठेवता ती जीवनशैली बनवली. शेजारी-पाजारी, झोपडपट्टी, बैठ्या चाळी आणि एसआरएतील सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी रात्रंदिवस झगडणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. नळवाले दाजी ही ओळख केवळ नावापुरती नसून समाजमन जपणारी आहे.
जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन “माणूस हीच आमची जात” ही भूमिका त्यांनी कायम जपली. समाजसेवा ही रक्तात आणि हृदयात असावी लागते, ती प्रत्येकाकडे नसते—हे त्यांच्या कृतीतून दिसते. निवडणुका आल्या म्हणून लोकांकडे जाणे आणि नंतर पाठ फिरवणे, असे हे नेतृत्व नाही; म्हणूनच “महाराष्ट्रनगर-चिताकॅम्पमध्ये नळवाले दाजी आमचेच आहेत” ही भावना आज घराघरांतून उमटते.
याच विश्वासातून मतदारांनीच त्यांच्या धर्मपत्नी सौ. केशर सदाशिव बालगुडे यांना अपक्ष उमेदवारी दिली आहे. “त्यांचा विजय म्हणजे आमचा विजय” असे नागरिक ठामपणे सांगत आहेत. तुम्हीच नगरसेवक आहात, आम्ही फक्त आमचे नेतृत्व महापालिकेत पाठवत आहोत—उमेदवाराने केलेले हे जाहीर विधान मतदार-नेतृत्वातील नाते अधिक दृढ करणारे ठरले आहे.
खासदार, आमदार, मंत्री आले-गेले; मात्र परिसरातील समस्या तशाच राहिल्या, अशी खंत नागरिक व्यक्त करतात. रुग्णालयाचा अभाव, शाळांची अपुरी संख्या, वाढत्या आरोग्य समस्या, सांडपाणी तुंबणे, बंद नळाद्वारे पाणी न येणे—अशा असंख्य प्रश्नांनी महाराष्ट्रनगरवासीय त्रस्त आहेत.
याच पार्श्वभूमीवर “सामान्य माणसाचे सुख-दुःख जाणणारे नेतृत्व” म्हणून अपक्ष उमेदवार केशर सदाशिव बालगुडे यांना एकमुखाने, प्रचंड बहुमताने निवडून देण्याची ग्वाही नागरिक देत आहेत. ही केवळ निवडणूक नाही, तर समाजमनातून उभे राहिलेले भावनिक आवाहन आहे.मुख्य संपादक चंद्रकांत दुंडे
संपर्क.8806043369














