लोणी काळभोर – पुणे जिल्हातील थेऊर येथील नावाजलेला व अनियमिततेमुळे गेले १४ वर्षांपासून पासुन बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळानी घेतलेली सभासदांची सर्व साधारण सभा अभुतपुर्व गोंधळात पार पडली
चेअरमन सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली थेऊर रस्त्यावरील वृंदावन कार्यालयात ही सर्व साधारण सभा पार पडली .
एके काळी महाराष्ट्रात आघाडी वर असलेला यशवंत कारखाना हा हवेली तालुक्याचा मानबिंदू होता. आर्थिक अडचणीत सापडल्याने या कारखान्याला कुठल्याही संस्थेने व बँकेने आर्थिक पुरवठा न केल्याने कारखाना १४ वर्षांपासून बंद आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये रोजी विशेष सर्व साधारण सभेमध्ये कारखान्याची थोडीफार जमीन विक्रीचा ठराव सर्वानुमते पास करण्यात आला होता . पण आज पर्यंत कोणीही ही जमीन खरेदी करू शकले नाही. प्रत्येक निवडणूकीत कारखाना चालू करू असे राजकारणी आश्वासन देत आहेत . मागील वर्षी कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ आले कारखाना चालू करण्यासाठी ९९.२७ एकर जमीन
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला देण्याचा प्रस्ताव कारखान्याने दिला आहे .तसेच २६ तारखेला सर्वसाधारण सभेत तशी सभासदांची परवानगी सभासदांची घेण्यासाठी ही सभा घेण्यात आली . संचालक मंडळाने वृंदावन पँलेस येथे सर्व साधारण सभेचे आयोजन कारखाण्याचे चेअरमन सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.
प्रभारी कार्यकारी कैलास जरे यांनी विषय पत्रिकेवरील विषय वाचण्यास सुरुवात करताच प्रचंड गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर विषय पत्रिकेवरील विषयी संचालक मंडळाने अभुतपूर्व गोंधळात मंजूर करीत अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात ही सभा गुंडाळली त्यामध्ये जमीन विक्रीचा विषय सुद्धा महत्त्वाचा मंजूर करून घेतला . या सभेस पांडुरंग काळे यांनी सभासदांची देणी कारखान्याने का दिली नाही म्हणून संचालक मंडळाला धारेवर धरले संचालक मंडळाने कारखान्याकडे शिल्लक नसल्याचे सांगितले त्यामुळे सभेस गोंधळ निर्माण झाला या गोंधळात संचालक मोरेश्वर काळे यांनी विषयपत्रिकेवरील सर्व विषय वाचत ठराव मंजूर आहे का म्हणून सभासदांना विचारताच आवाजी मतदानाने सभासदांनी ठराव मंजूर असल्याची घोषणा देत संचालक मंडळांनी सभा संपल्याचे जाहीर केले .सभा संपल्यावर नाराज सभासदांनी निषेध व्यक्त करत न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला.
मुख्य संपादक.चंद्रकांत दुंडे
बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
8806043369.










