मुंबई | मानखुर्द प्रतिनिधी
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रनगर–चिताकॅम्प (वॉर्ड क्र. १४३)मध्ये राजकारणावर नव्हे, तर लोकशाहीवर विश्वास ठेवणारी जनता रस्त्यावर उतरली. “हा उमेदवार आमचाच” या भावनेतून नागरिकांनी अपक्ष उमेदवार सौ. केशर सदाशिव ऊर्फ नळवाले दाजी बालगुडे यांच्या विजयाचा ठाम निर्धार व्यक्त केला.
महिला-पुरुषांनी शिस्तबद्ध रांगेत रॅली काढत मतदारांशी हस्तांदोलन केले आणि शिट्टी चिन्हासमोरील बटन दाबण्याचे आवाहन केले. नागरिकही उत्स्फूर्तपणे पुढे येत “आता आमचाच उमेदवार विजयी होणार” असा विश्वास व्यक्त करत होते.
प्रचाराची सांगता महात्मा फुले गृहनिर्माण सोसायटी, खंडोबा मंदिर, गणेश मैदान, शिवाजी मैदान, सुभाषचंद्र बोस शाळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन, शांतीनगर, भीमनगर व चिताकॅम्प या मार्गावरून भव्य रॅलीद्वारे झाली. खंडोबा मंदिर परिसरातील चौकसभेत “दबाव व आमिषांना बळी न पडता आपलाच उमेदवार प्रचंड मतांनी निवडून द्या,” असा स्पष्ट संदेश देण्यात आला. “चिन्ह एकच—शिट्टी!” हा नारा परिसरभर घुमत राहिला.
किन्नर समुदायाच्या नेहा नानी यांनीही उघड पाठिंबा जाहीर करत सांगितले, “आमचा आधार फक्त काम आणि माणुसकी आहे. ती दाजी बालगुडे यांनी जपली आहे. म्हणून विकासाच्या बाजूने उभ्या असलेल्या सौ. केशर सदाशिव ऊर्फ नळवाले दाजी बालगुडे यांनाच निवडून द्या.”
महाराष्ट्रनगरमध्ये ही निवडणूक आता केवळ उमेदवाराची नाही, तर जनतेने स्वतः निवडलेल्या नेतृत्वाच्या आत्मसन्मानाची लढाई ठरत आहे. “एकच वादा – नळवाले दाजी” हा संकल्प मतदारांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असून तो कौल शिट्टीवर उमटण्याच्या मार्गावर आहे.
मुख्य संपादक.चंद्रकांत दुंडे
संपर्क 8806043369










